शुक्रवार, ५ जुलै, २०१३

स्वातंत्र्य त्यांचे !


स्वातंत्र्य त्यांचे !
आता देश स्वतंत्र झालाय
आम्ही देशाचा विकास करणार
भारत देशात परत सोन्याचा धूर काढणार
असे म्हणत त्यांनी मतांचा जोगवा मागितला
पुढे त्यांचे सरकार झाले
भालदार चोपदार असतात तसे
नगरसेवक , आमदार , खासदार आले
वेगवेगळ्या विभागात मंत्री स्थानापन्न झाले
विकासाचा विडा उचलला
सरकारी खजिना पणाला लावला
घर ..दार ..दहा पिढ्यांचा विकास झाला
जनतेच्या पैश्यावर जन्म त्यांचा सार्थ झाला
मग पुढे विरोधी पक्ष आले
आम्हालाही विकास हवा म्हणाले
सत्ताधारीना शिव्या देत ते ही सरकार झाले
नवा गडी नवी लुट ..संसदेचा हवाला उठ सुठ
सवलती.. आरक्षणांची ..गाजरे
मागे पुढे नाचती मग सरकरी हुजरे
सत्ता पालटाची तुतारी..जुनेच झाल साजरे
गरिबी हटावचे कर्कश्य नारे ..एक गाय लाख वासरे
पंजा ..कमळ..कंदील .घड्याळ
लबाडीचेच सारे डाव तिन्ही त्रिकाळ
निशाणी बदलली.. नियत नाही बदलली
पक्ष बदलले ..मात्र दरोड्यांचा झाला सुकाळ
कोळसा . वीज , इंधन , पाणी
वेगवेगळ्या योजनांनी अखेर हेच धनी
जात ..धर्म .पंथ यात मतदारांना विभागले
निवडून कोणीही येवो ..देशवासी मात्र अनवाणी
आला माहितीचा अधिकार
वाटले उघडेल यांच्यासाठी नरकाचे दार
यांनी एकी केली स्वतच्या चारित्र्याची हमी दिली
स्वतंत्र झाले नेते ..पुढारी ..जनतेला सीबीआय च्या हवाली केले !
........ तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा