शुक्रवार, ५ जुलै, २०१३

काल रात्री स्वप्नात गांधीजी आले


काल रात्री स्वप्नात गांधीजी आले
चार दोन शेलक्या शिव्या शिकव म्हणाले
मी म्हणालो बापूजी हे भलतच काय
दुसरा काहीतरी शोधा तुम्ही पर्याय
आपण पडला अहिंसेचे पुजारी
कशाला हवी ही हिंसेची शिदोरी
म्हणाले , खड्यात गेली अहिंसा
माझे नाव घेत माजवलीय हिंसा
सत्तेचे भोग त्यांनीच भोगले
मला मात्र फक्त भिंतीवर टांगले
तत्वांचे आचरणाने मी लोक गोळा केले
माझ्या नावावर यांनी स्वतःकडे वळवले
मी देखील आता निवडणूक लढवणार
नेत्यांच्या पापाचे घडे फोडणार
अण्णा हजारेंबरोबर उपोषण करणार
जनता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणार !
- तुषार नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा