शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

.........

नुकताच कुठतरी म्हणे 
गांधींच्या चरख्याचा लिलाव झाला ..
विचार मातीमोल झाले 
मात्र चरख्याला चांगलाच भाव आला .

उठता बसता नाव घेणारे 
लिलावात कुठे दिसलेच नाहीत कुणाला 
त्यांच्या तत्वांची ग्वाही देणाऱ्या 
निवडून येणाऱ्यांचा पत्ता नाहीच लागला 

शाळा , रस्ते , चौक , पुतळे
इतके सर्व काही केलेय त्यांच्या स्मरणाला
विचार आणि तत्वांचे
छान भरीत केलेय निवडणुकीत वाढायला

अहिंसा ..सहिष्णुता ..
मस्तच लागते कधी तोंडी लावायला
चरखा घेवून काय कप्पाळ
उगाच अडचण होईल घरात ..पक्षात !



- तुषार नातू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा