मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

प्राणत्याग !


' आप ' च्या दिल्लीत आलेल्या सुनामीने 
राजकारणी सगळे चिंतीत..हैराण परेशान 
कसे थोपवावे वादळ ..आले चर्चेला उधाण 

बैठका दिग्गजांच्या वारंवार झडू लागल्या 
लोकपाल लागू करणे हा पर्याय पुढे आला 
देवू सध्या लोकपाल .. नंतर काढूनही घेवू 

पंजाच्या गोटात आरोप प्रत्यारोपही झाले
माकडचाळे करणारे जरा वेळ शांत बसले
नवीन कुरापतीसाठी विचार करू लागले

कमळाने जरी सारेच आलबेल दाखवले
वल्लभभाई पटेल आता तारतील वाटले
नमोंचे महत्व आणखीनच वाढवू म्हंटले

तिसऱ्या मोर्चाने नौकेला किनाऱ्याला नेले
नवे शीड बांधायला घेवून नावाडी बदलले
पाच सहा नावाडी एकदम सागराला भिडले

२०१४ पूर्वी एखाद्या जेष्ठ केंद्रीय नेत्याने
प्राणत्याग केला पाहिजे असेही सुचवले
मरणार कोण ? कशी मिळणार सहानुभूती ?

प्रश्न मोठा पडला ..प्राणत्यागाला कोणीही
तयार नाही झाला ..शेवटी गुप्त खलबते
कळेलच आता कोण अपघाताने मरते ते

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा