शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

जयहिंद ! ! !


' मेरे देश की धरती ' ऐकले की मग 
कितीही मरगळ असली मनाला तरी
मन अभिमानाने ...भारतमातेच्या 
संग्रामात बलिदान केलेल्या वीरांच्या 
आठवणीने उभारी घेते...सज्ज होते 
नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नव्याने 

' कर चले हम विदा ' चा करुण संदेश 
याद करून देत असतो... सदोदित
माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी
घेत असलेल्या श्वासासाठी सीमेवर
धारातीर्थी होण्यास सज्ज जवानांची
त्यांच्या व्याकूळ ..धन्य कुटुंबियांची

' रंग दे बसंती चोला ' चा रक्तरंग
घरादाराची राखरांगोळी करणाऱ्या
क्रांतीकारकांच्या घरातील काळोख
जालीयानवाला बागेतल्या निघृण
नरसंहार.. माझे रक्त उकळवतोच
ताठ मानेने मी तिरंग्याकडे पाहतो

' जयोस्तुते ' च्या त्या समरस्वराने
संमोहित होऊन मी घराबाहेर पडतो
मुलाचे बोट धरून त्याला सांगतो
तीन रंगांची महती ...अशोकचक्राचे
साम्राज्यपूर्ण वैराग्य आपोआप मग
माझ्या ओठातून ' जयहिंद उमटते !

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा