शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

चित्त दुष्काळी !



अविरत कोसळणारा पाऊस..तरीही मनाची तलखी कायम
सर्वांगी चिंब भिजून ओलेता . तरीही मी अंतरी कोरडलेला
शुष्क जमीन गंधाळूनही ..माझ्या मनातला वैशाख धुरळा
हिरवी पालवी न्हाऊन टवटवीत ...मीच मलूल कोमेजलेला
श्रावणाचे शुभशकून जागोजागी..चित्तच नेहमीचे दुष्काळी

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा